Rahul Gandhi – देशात गरीब ही एकमेव जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nrandera Modi ) म्हणतात. तसे असेल तर ते स्वत:ला इतर मागास वर्गातील (ओबीसी) सदस्य का म्हणवतात, असा सवाल कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शनिवारी केला.
मोदी सरकार आणि भाजपची कोंडी करण्यासाठी विरोधकांकडून देशभरात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी रेटली जात आहे. बहुधा, विरोधकांच्या त्या मागणीची धार कमी करण्यासाठी गरीब ही सर्वांत मोठी जात असल्याची भूमिका मोदी मांडत आहेत.
त्यावरून राहुल यांनी छत्तिसगढमधील सभेत मोदींना लक्ष्य केले. देशात दलित, आदिवासी, मागास असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे, असा शाब्दिक टोला त्यांनी लगावला. वनवासी असा उल्लेख करून भाजप आदिवासींचा अपमान करतो.
वनवासी आणि आदिवासी या संकल्पनांमध्ये खूप फरक आहे. आदिवासी म्हणजे देशाचे मूळ मालक. तर, वनवासी म्हणजे प्राण्यांप्रमाणे जंगलात राहणारा. आदिवासींना जमीन, पाणी, जंगले परत द्यावी लागतील या धास्तीने भाजप तो शब्द वापरत नाही, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले.