चिंबळी -भामा आसखेड जलवाहिनीचे कामाचे विघ्न काही संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. खोदकामात रस्त्याची झालेली दुरवस्था आता कारणीभूत ठरली असून चिंबळीकरांनी हे काम बंद
पाडले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या भामा आसखेड जलवाहिनीमुळे माजगांव ते चिंबळी कडवस्ती पदमावतीनगर रसत्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या रसत्यावर पायी चालणे व मोटार सायकल चालविणे मोठे कसरतीचे झाले आहे. शुक्रवारी (दि. 11) चिंबळी ग्रामस्थांच्या वतीने पदमावती नगर येथे सुरू असलेले जलवाहिनीचे काम अडविण्यात आले.
माजी सरपंच विजय जगनाडे, माजी सभापती विलास कातोरे, दत्तात्रय विधाटे यांनी सांगितले की, पहिले रस्त्याचे काम करा आणि मग जलवाहिनीसाठी खोदाईचे काम सुरू करा.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे शाखा अभियंता निवृती उतळे, कनिष्ठ अभियंता दिपक सोनवणे, भामा आसखेड अभियंता राजेश भूतकर, प्रांत अधिकारी संदेश शिर्के, निवृत्ती उतावळे उपस्थित होते.