वाल्हे: मागील दोन-अडीच महिन्यापूर्वी शासनाने लॉकडाऊन जाहिर केला होता. तसेच महाराष्ट्रातील गावांमधील आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर आता जनजीवन सुरळीत करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यानुसार वाल्हे (ता.पुरंदर) येथील आठवडे बाजार मंगळवार (दि.०९) पासून काही अटी व शर्तीवर सुरू करण्याचा निर्णय आज वाल्हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला असल्याचे, ग्रामपंचायतीने प्रसिद्धी पञकाद्दारे कळविले आहे.
वाल्हे येथील आठवडे बाजार हा परिसरामधील शेतकरीवरवर्ग व स्थानिक व्यापारी वर्गापुरताच सिमित राहाणार असून, बाहेरील गावांमधील व्यापारी वर्गाने वाल्हे येथील बाजारामध्ये येऊ आपली दुकाने लावता येणार नाहीत, तसेच मंगळवारी (दि.९) भरणार बाजार पूर्वी भरत असलेल्या ठिकाणी भरणार नसून, आठवडे बाजार हा महात्मा फुले पुतळया पासून , गावापर्यंतच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला सर्व व्यापारीवर्गाने बसायचे असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रसिद्धी पञकाद्वारे कळविले आहे .
आठवडे बाजारामध्ये येताना सर्वांना तोंडाला मास्क किंवा रूमालाचा वापर बंधनकारक आहे. आठवडे बाजाराच्या ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, त्यांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध पञकाद्दारे कळविले आहे. तसेच बाजारातील सर्व दुकाने व ग्राहक यांच्यामध्ये सहा फुटाचे सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. तसेच बाजारामध्ये गुटखा, पान,तंबाखू, खाण्यास सक्त मनाई असून, मद्यपान करण्यासही सक्त मनाई राहणार आहे.
वरील ,अटी व शर्तीचे व शासनाच्या नियमांचे भंग करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था, संघटना यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ग्रामपंचायतीने प्रसिद्धी पञकाद्दारे कळविले आहे.