धरणात केवळ पाच टीएमसी पाणीसाठा
सिंचन आणि बिगरसिंचनाचा पाणीपुरवठा बंद
पश्चिमेकडील वीजनिर्मिती प्रकल्प 99 टक्के ठप्प
विजय लाड
कोयनानगर –जून महिना संपत आला तरी मान्सूनने पाठ फिरवल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. कडक उन्हामुळे शिवसागर आटला आहे. धरणात केवळ 10 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील 5.12 टीएमसी पाणीसाठा मृत आहे. त्यामुळे धरणात केवळ पाच टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असल्याने त्याचा पूर्वेकडील सिंचन, बिगर सिंचन प्रकल्पासाठी होणारा पाणी पुरवठा अखेर बंद करण्यात आला आहे.
वीज निर्मिती करण्यात येत आहे. दोन हजार मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असणाऱ्या पश्चिमेकडील कोयना जलविद्युत प्रकल्पातून केवळ 36 मेगावॅट वीज निर्मिती होत असल्याची गंभीर स्थिती आहे. त्यामुळे कोयनेतून सिंचन व वीज निर्मितीसाठी पाणी देण्याचे बंद केले आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात सध्या 10.82 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात असणारा पाणीसाठा पूर्वेकडील शेती व पिण्यासाठी आरक्षित करण्यात आल्यामुळे याचा फटका पश्चिमेकडील वीज प्रकल्पाला बसला आहे. धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे पश्चिमेकडील एक हजार मेगावॅट क्षमतेचा चौथा टप्पा गत सप्ताहात बंद पडला आहे. त्यापाठोपाठ वीज निर्मितीच्या अन्य टप्प्यालाही कमी पाणीसाठ्याने घरघर लागली होती.
महानिर्मिती कंपनी वीज प्रकल्पाचे अन्य टप्पे काही मिनिटांसाठी चालू करून बंद करत आहेत. याचाच परिणाम पश्चिमेकडील अन्य वीज प्रकल्पांना बसला आहे. टप्पा एक, टप्पा दोन व टप्पा चार मधून वीज निर्मिती केल्यावर पाणी कोळकेवाडी धरणाच्या माध्यमातून 320 मेगावॅट क्षमतेच्या तिसऱ्या टप्प्याला देवून वीजनिर्मिती करण्यात येते. सध्या टप्पा चार पूर्णता बंद असून टप्पा एक व दोन चालू करून लगेच बंद करण्यात येतो. त्यात कोळकेवाडी धरणात पाण्याचा दुष्काळ असल्याने या टप्प्याला वीजनिर्मितीसाठी पाणी मिळत नसल्याने हा टप्पा वीजनिर्मिती अभावी बंद पडला आहे. पश्चिमेकडील वीज प्रकल्पाचे टप्पा तीन व चार बंद असून टप्पा एक व दोन चालू करून बंद करत आहेत. पायथा वीजगृह बंद आहे. पश्चिमेकडील वीजनिर्मिती प्रकल्प 99 टक्के बंद असल्याने वीजटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात बसत आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पाचा एक हजार मेगावॅट क्षमतेचा चौथा टप्पा बंद झाल्यावर आता तिसरा टप्पाही कोयना धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे बंद झाला आहे. विजनिर्मितीचे तीन व चार हे टप्पे बंद झाले आहेत. तर टप्पा एक व दोन मधून कमी प्रमाणात
“”कोयना धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मितीला मोठा फटका बसला आहे. प्रकल्पाचे दोन टप्पे बंद, तर दोन टप्पे सुरू आहेत. पण, प्रकल्पातून 99 टक्के वीजनिर्मिती बंद आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्यावर यामध्ये सुधारणा होईल, अशी आशा आहे.
संजय चोपडे, मुख्य अभियंता, कोयना जलविद्युत प्रकल्प