नवी दिल्ली : 2012 च्या खळबळजनक निर्भया बलात्कात आणि हत्या प्रकरणात फाशी ठोठावण्यात आलेल्या विनय शर्मा याने राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळण्या विरोधात केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. आर. भानुमती , न्या. अशोक भूषण आणि न्या. ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीटाने तो मानसिकदृष्ट्या सक्षम आणि वैद्यकीय स्थिती स्थीर असल्याचे त्याच्या वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट होत आहे, असे म्हटले आहे.
राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळताना सर्व बाबी विचारात घेतल्या असल्याचेड त्यांनी म्हटले आहे. विनय शर्माची दुरूस्ती याचिका सर्वोच्च न्यायलयाने 14 जानेवारी रोजी फेटाळल हिोती. तर राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज एक फेब्रुवारी रोजी फेटाळला होता. कारागृहात आपला मानसिक ाणि शारीरिक छळ होत असल्याने मानसिक स्थिी ठिक नसल्याच दावा त्याने केला होता. कारागृहात झालेल्या छळाने त्याने अनेकदा ात्महत्येचा प्रयत्न किंवा स्वत:ला दुखापत करून घेण्याचा प्रयत्न केला होता, असे या याचिकेत म्हटले होते.
धावत्या बस मध्ये मुकेश सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर यांनी 16 डिसेंबर 2012 बलात्कार करून खून केल्याबद्दल दोषी ठरवले होते. त्यांना फअशी शिक्षा ठोठावणण्यात आली आहे.