मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील सरकार हे छत्रपती शिवाजी महाजारांच्या विचारांवर चालत असल्याचं सांगत मलिक यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असंही म्हटलं.
अमरावती शहरात हिंसा घडविण्यासाठी तरुणांना पैशांचं वाटप करण्यात आल्या. अनेकांना दारु पुरवली गेली. त्यानंतर दगडफेक झाली आणि अनेक दुकाण जाळण्यात आली. या दंगली घडविण्यासाठी मुंबईतून अमरावतीला पैसे पोहोचले. हे सगळं पोलिस तपासात समोर येईलच, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान सरकार पाडण्यासाठी सर्व हातखंडे वापरून झाल्यानंतर भाजप हिंसक दंगली घडवण्यावर भर देतंय. मात्र भाजपने अशा प्रकारे राजकारण करू नये. भाजपकडून नेहमीच सांगण्यात येत की, महाराष्ट्र सरकार उखडून फेकू. मात्र भाजपने हे लक्षात घ्यायला हवं की, जनता सरकार निवडून देते. त्यामुळे कोणतही सरकार उखडून फेकता येत नसतं.
दरम्यान केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून भाजप राज्यातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र भाजपने समजून घ्याव की, पैशांच्या आणि भितीच्या जोरावर महाराष्ट्रातील सरकार पडू शकत नाही. राष्ट्रीय नेतृत्व म्हणत, राज्यातील सरकार लक्ष्मीच्या चुंबकाने चालतं. मात्र तस नसून महाराष्ट्रातील सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं आहे. महाराजांच्या प्रेरणेने सुरू असून हे सरकार 5 वर्षे पूर्ण करणार, असंही मलिक यांनी ठणकावलं.