बेल्हे -सुलतानपूर (ता. जुन्नर) सुलतानपूर ते मंचर फाट्याला जोडला जाणारा तीन ते साडेतीन किलोमीटरचा डांबरी रस्ता पहिल्याच पावसाळ्यात जागोजागी खचला असून रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे सुलतानपूर ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून या कामाचा निषेध व्यक्त केला आहे.
या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून तीन ते चार महिन्यांपूर्वीच डांबरीकरण झाले होते. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या कामाची तात्काळ चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. लॉकडाऊनमध्ये या रस्त्यावर तुरळक वाहतूक आहे. जर ऊस व अवजड वाहतूक सुरू झाली तर रस्त्याची अधिक दुरवस्था होईल. याला जबादार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
रस्त्यावरून अवजड वाहन जाताना रस्ता खचत आहे. या निषेधार्थ ग्रामस्थ संबंधित दोषींविरुद्ध निषेध केला. यावेळी अनिल आतकरी, उमेश बबन आतकरी, अवधूत आतकरी, बाळासाहेब आतकरी, उमेश शिवाजी आतकरी, संपत जगदाळे, शेवराज डावखर, बाळासाहेब डावखर, नितीन आतकरी, हरीभाऊ आतकरी, आशोक आतकरी उपस्थित होते.