कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये शांतता राखण्यासाठी आणि राज्यात द्वेष व हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी वादग्रस्त “द केरळा स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातली आहे. या चित्रपटावर बंदी घालणारे पश्चिम बंगाल हे पहिले राज्य ठरले आहे.
याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य सचिवांना हा चित्रपट थिएटर्समधील स्क्रीनवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “द काश्मीर फाईल्स’ म्हणजे काय? हा चित्रपट काश्मिरी लोकांचा अपमान करण्यासाठी होता. तसेच “द केरळा स्टोरी’ ही रंगवलेली कथा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.