मुंबई – जम्मू काश्मीरसंबंधी असणारे कलम 370 केंद्र सरकारकडून हटवण्यात आल्यानंतर देशासह जगात याचे पडसाद उमटत असल्याचे दिसत होते. मात्र गुरुवारी याबाबत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसोबत संवाद साधला आहे. या संवादानंतर पुन्हा एकदा देशासह जगात याचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टच्या आई सोनी राजदान यांनी ट्विट केले आहे. जे सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
Rousing and very positive speech by the PM. I do hope people in Kashmir were able to see it too ? @PMOIndia
— Soni Razdan (@Soni_Razdan) August 8, 2019
दरम्यान, सोनी राजदान यांनी मोदी यांच्या जम्मू काश्मीरबाबतच्या संवादाबाबत ट्विट केले आहे की,”मला आशा आहे कि, पंतप्रधान मोदी यांचे सकारात्मक भाषण काश्मिरी लोकांना सुद्धा बघायला मिळाले असेल.’ त्यांच्या या ट्विटमुळे ट्विटर युजर्स त्यांना काश्मीर येथे इंटरनेट सेवा बंद करण्याचा मुद्यावर प्रश्न विचारत आहे. तर काही युजर्स त्यांच्यावर टीक करीत आहे. तत्पूर्वी कलम हटवल्यामुळे कोणतीही बिकट परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे असा विचार इथल्या जनतेने करू नये तसेच घाबरू जाऊ नये असे आवाहनही यावेळी पंतप्रधान मोदींनी केले होते.