छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेल्या भोर, वेल्हा, मुळशी मतदारसंघातील लोकप्रिय, प्रभावशाली, कर्तबगार युवा नेते, कॉंग्रेसचे आमदार संग्रामदादा अनंतराव थोपटे यांनी विकासकामांचा परिघ पूर्ण केला आहे. गावगाडा आणि शहराशी नाते असलेल्या या तीन तालुक्यांतील जनतेशी त्यांनी नाळ घट्ट केली आहे.
तळागाळातील प्रश्न, जनतेप्रती आपुलकी, आत्मीयता, विकासकामांचा निपटारा, मूलभूत सुविधांचा ध्यास आदी कार्याभिमुख नेतृत्वातून दादांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भक्कम स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू मानून आदरणीय संग्रामदादांनी त्यांच्यासाठी विकासकामांचा ध्यास घेतला आहे. कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून दादांनी गावागावांतील तरूणांना संघटीत करून मुख्य प्रवाहात आणले आहे. आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यतत्परतेला दिलेला उजाळा…
सह्याद्रिच्या डोंगररांगामधील मावळ प्रदेश महाराष्ट्राच्या भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीने समृद्ध असलेला प्रदेश आहे. इतिहास, संस्कृती व परंपरा यांनी प्रसिद्ध असलेला हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाने व पदस्पर्शाने पावन झाला आहे.
शिवरायांच्या स्वराज्याची ही कर्मभूमी इथल्या वीर पुरुषांनी महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव जपणाऱ्या गडकोट किल्ल्यांनी राष्ट्राच्या इतिहासावर आपला खोल ठसा उमटविला आहे. ही ऐतिहासिक परंपरा व थोरामोठ्यांचा वारसा प्रभावीपणे पुढे नेण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे भोर-वेल्हा मुळशीची कर्तबगार आमदार, सन्माननीय संग्रामदादा थोपटे आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक प्रभावी नेतृत्व आहे.
समृद्ध भौगोलिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या भोर-वेल्हा-मुळशी परिसराचा सर्वांगाने कायापालट करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करीत आहेत. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने परिसराचे महत्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेले आहे.
त्यांच्याच कार्याचा वारसा पुढे चालवत मा. संग्रामदादा थोपटे यांनी आपल्या कर्तबगारीच्या तसेच प्रभावशालील व्यक्तीमत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या समाजकारण, अर्थकारण व राजकारणावर प्रभावीपणे उमटवला आहे. एक तरुण तडफदार, अभ्यासू व सर्वसमावेशक एक सकारात्मक व्यक्तीमत्व असाच त्यांचा नावलौकिक आहे.
भोर, वेल्हा, मुळशी हा विस्ताराने मोठा असलेला मतदारसंघ दादांनी आपल्या वेगवान संपर्काच्या धोरणाने विकासोन्मुख बनविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. प्रादेशिक, आर्थिक, दळणवळणासंदर्भात अनेक अडथळे असूनही त्यांनी हा दुर्गम प्रदेश सर्वांगीणदृष्ट्या विकसित करणाऱ्यावर जोर दिला आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, शेती उद्योग, सहकार, सेवा, सुविधा आदी सर्वच क्षेत्रात दादांनी रचनात्मक कार्य सुरू ठेवले आहे. विकासकामात ते उत्तरोत्तर आघाडीवर राहिलेले आहेत. भोर शहराच्या विकासात त्यांचे बहुमोल योगदान आहे.
भोर शहारातील रस्त्यांचे मजबूतीकरण, कॉंक्रिटीकरण, पेव्हींग ब्लॉक हे महत्वाचे काम अतिशय प्रभावीपणे केले आहे. तसेच नगरपालिकेची अद्ययावत सुशोभित व सर्व सुविधांनी सुसज्ज इमारत, ग्रामदैवत मंदिर, दीक्षाभूमी या संदर्भात काम त्यांनी यशस्वीपणे पूर्णत्वास नेले आहे.
शहरातील कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना, सीसीटिव्ही यंत्रणा, अग्नीशमन दल, आरोग्य सुविधा, राजवाडा चौकाचे सुशोभिकरण, भोर शहरातील सर्व विभागांमध्ये सर्व सोयी सुविधांची पूर्तता करण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे. प्रत्येक काम स्वत: लक्ष घालून सातत्याने पाठपुरावा करून ते जास्तीत जास्त चांगले व सुशोभित व शाश्वत करण्यावर त्यांचा नेहमीच भर असतो.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविणारे आमदार संग्रामदादा एक कर्तृत्वशाली युवा नेता आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा कामकाजात त्यांचा मोलाचा सहभाग असतो. ते काही काळ विधानसभेचे हंगामी अध्यक्षही राहिले आहेत. तसेच ते कॉंग्रेसचे प्रभावशाली व निष्ठावंत नेते आहेत.
पुणे जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यात दादांची भूमिका महत्वाची आहे. विधानसभेत त्यांनी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर लक्षवेधी आवाज उठविला आहे. त्यांची विधानसभेतील क्रियाशील उपस्थिती लक्षणीय स्वरूपाची आहे.
आजपर्यंत त्यांनी लोकांच्या विविध प्रश्नांवर विधानसभेचे लक्ष सातत्याने वेधले आहे. तसेच प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच आग्रही पाठपुरावा केला आहे. आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून यातून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. यापुढे त्यांच्या या विकासाभिमुख कामासंदर्भात पाठपुरावा कायम राहणार आहे.
घरकुल योजना, मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना. विविध रस्ते निर्मिती व दुरूस्ती, दुर्गम भागातील रस्ते व पुलांची कामे, पाणीपुरवठा योजना, कृषी सिंचन योजना, डोंगरी विकास कार्यक्रम, सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण, बेरोजगारांना रोजगारांच्या संधी आदी चौफेर विकासकामांवर भर दिला आहे. तसेच तळागाळापर्यंत लोकांशी संपर्क जोडून संवादाचा सेतू बांधला आहे.
भोर मतदारसंघातील तरूणांना नोकरीच्या प्रवाहात आणण्यासाठी रोजगार मेळाव्यात त्यांनी 92 नामाकिंत कंपन्यांना सहभागी करून 2 हजार युवकांना रोजगाराची संधी दिली आहे. आमदार संग्रामदादा थोपटे महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक जीवनातही व्यापक पद्धतीने कार्यरत आहेत.
राजगड ज्ञानपीठ संस्थाचे कार्याध्यक्ष या नात्याने त्यांनी डोंगरी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सर्वांगीण शैक्षणिक सुविधा कशा मिळतील, यावर भर दिला आहे. फुले-शाहू-आंबेडकर या विचार मंचाच्या माध्यमातून महान समाजसुधारकांचे विचार जनसामान्यात रुजविण्यावर भर दिला आहे.
तसेच सामाजिक सद्भाव व सलोखा निरंतर राहवा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत.
नैसर्गिक संकटे, साथीचा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे विस्कळीत झालेली जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दादांनी झोकून देऊन काम केले आहे. स्वत:च्या आरोग्याची पर्वा न बाळगता त्यांनी लोकांमध्ये जाऊन करोनाच्या काळात चालविलेले कार्य एका झुंजार योद्ध्यांसारखे आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून करोनामुळे संपूर्ण देश होरपळून गेला आहे.
संपूर्ण राज्यात करोनाचा कहर असताना लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार दादांनी भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यात सर्वसामान्यांना आधार देत उपाययोजना केल्या आहेत. तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधत प्रभावीपणे काम केले आहे. करोना साथीचा संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व रचनात्मक पद्धतीने आरोग्य व सुरक्षाविषयक कार्य केले आहे.
भोर- वेल्हा- मुळशी मतदारसंघातील लोकांना धीर देऊन त्यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा कशा मिळतील, याकडे लक्ष दिले आहे. विविध माध्यमातून त्यांनी लोकांना आणि गरजूंना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. यातून सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय अवघ्या मतदासंघात आला आहे.
दुर्गम आणि डोंगरी तालुक्यातील या गावांमध्ये करोनाचा प्रकोप वाढला असताना दादांनी नियोजनबद्ध भूमिका घेत सर्व घटकांना दिलासा दिला आहे. रोजगारांच्या संधी गमावलेल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला होता. परंतु दादांनी त्या गोरगरीब कुटुंबांना धीर देत जीवावश्यक वस्तूंचा पुरवठा केला.
गेल्या पंधरा वर्षांत विधानसभेत प्रतिनिधीत्व करताना मतदारसंघातील सुविधा, प्रलंबित प्रश्न, त्यासाठी पाठपुरावा करण्याचाच ध्यास दादांनी घेतला आहे.
आपल्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वांगिण जीवनावर आदरणीय दादांनी आपल्या कार्याचा बहुमोल ठसा उमटविला आहे. कॉंग्रेसचे एक अभ्यासू, निष्ठावंत नेते म्हणून ते महाराष्ट्रात परिचित आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात यापुढेही त्यांची वाटचाल अशीच लोकाभिमुख आणि विकासाभिमुख राहणार आहे. त्यांचे राजकीय विश्व आणखी उत्तरोत्तर व्यापक व वृद्धींगत होत जावे, महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात दादांचे कार्यकर्तृत्व सतत विकसित राहावे. त्यांना महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात वेळोवेळी उत्तमदर्जाची संधी मिळत राहो, ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक लाख लाख शुभेच्छा.
– शब्दांकन :
भुजंगराव दाभाडे, तालुका प्रतिनिधी-भोर.