पीठोरागढ – लखनौ येथील हरमिंमंदर कौर नावाच्या एका महिलेने आता डोकेदुखी वाढवली आहे. भारत- चीन सीमेवर नभीढांग या भागात तिने सध्या मुक्काम ठोकला असून तेथून माघे फिरण्यास ती नकार देते आहे. आपण माता पार्वतीचा पुनर्जन्म असून भगवान शंकराशी विवाह करण्यासाठी येथे आलो असल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांचा ताप वाढला आहे.
उत्तर प्रदेशच्या अलिगंज येथील ही माहिला तिच्या आईसमवेत गुंजी येथे गेली होती. तेथील दंडाधिकाऱ्यांनी तिला तेथे जाण्यासाठी पंधरा दिवसांची परवानगी दिली होती. मात्र आता ती परत येण्यास नकार देत आहे. कैलास पर्वतावर भगवान शंकराचे वास्तव्य आहे.
आपण पार्वतीचा पुनर्जन्म घेतला असून त्यांच्याशी विवाह करण्यासाठी आलो आहोत. आपल्याला जर बळजबरी केली तर आत्महत्या करू असा इशारा तिने दिला आहे. त्यामुळे मुदत संपल्यामुळे तिला तेथून घालवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथका हात हलवत परत यावे लागले. आता डॉक्टरांचा समावेश असलेले एक मोठे पथक परत पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.