जालना – पंतप्रधानांकडून अपेक्षा उरली नाही, मराठ्यांनी सुद्धा आता त्यांच्याकडून अपेक्षा सोडावी असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. आम्ही लढून आरक्षण मिळवणार असल्याचेही देखील जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. अशात आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला जाणार आहे. जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला काही दिवसचं बाकी असताना आता सरकारकडून वेगवान हालचाली सुरु असल्याचे पाहायला मिळते.
कुणबी नोंदणीसाठी सगेसोरये हा शब्द टाकण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली. त्यासाठी जरांगे हे मुंबईत आंदोलन करणार आहेत. मात्र जरांगे यांचे हे आंदोलन सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकते म्हणून सरकार पुन्हा एकदा जरांगे यांच्याशी बातचीत करणार करत आहे. त्याअनुशंगाने आज एक शिष्टमंडळ पुन्हा एकदा त्यांची भेट घेणार असल्याचे समाजते.
राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरंगे यांची भेट घेऊन त्यांना ड्रॉफ्ट दाखवणार आहे. यामुळे या आंदोलनाबाबत आज अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या दुरुस्त्यांसह अधिसूचना काढण्यात येणार असल्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन संपणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांमुळे मराठा आरक्षण आणि जरांगे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे.