पवनानागर – बंद जलवाहिनी कायमची रद्द झाली पाहिजे. या जलवाहिनीस मावळ तालुका शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलन विरोधात 9 ऑगस्ट 2011 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मावळ तालुक्यातील शेतकरी बांधव शहीद झाले. शहीद कांताबाई ठाकर, शहीद मोरेश्वर साठे, शहीद शामराव तुपे यांच्या 12 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने पवन मावळ येथील येळसे गावातील स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यात आले.
या वेळी शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, मावळ तालुका संघटक अमित कुंभार यांनी पवना बंदिस्त जलवाहिनी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. अजूनही आंदोलनातील शेतकरी बांधव 12 वर्षे उलटून ही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या वेळी तालुका शिवसेनेच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण न करता राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत पक्षाच्या वतीने वैयक्तिक श्रद्धांजली अर्पण केली.
या वेळी स्मृती स्थळावर अभिवादन करताना शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, तालुका संघटक अमित कुंभार, तालुका सल्लागार मारुती खोले, उपतालुका प्रमुख किसन तरस, विभाग प्रमुख युवराज सुतार, उमेश दहिभाते, थुगावचे सरपंच प्रकाश सावंत, युवासेना उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, विभाग अधिकारी अक्षय येळवंडे, बाळासाहेब शिंदे, भरत भोते, शाखाप्रमुख किशोर शिर्के, शंकर दळवी, अतुल केंडे, विकास कालेकर, छबन काळे, बाळासाहेब जाधव, नारायण बोडके, अनंता वर्वे, कल्याणी ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, सीमा ठाकर, संदीप भुतडा, गणेश ठाकर व सर्व शिवसेना मावळ तालुका पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमित कुंभार म्हणाले की, जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी भाजपाने आक्रमकपणे भूमिका घ्यावी. प्रकल्प रद्द करण्यासाठी सामूहिक राजीनामे देऊन दबाव आणून, या टांगत्या तलवारीतून मावळवासीयांची सुटका करावी.
आत्मदहनाचा इशारा
वडगाव मावळ येथील निष्ठावान शिवसैनिक बाळासाहेब शिंदे हे गेली 12 वर्षे स्मृती स्थळावर वडगाव ते पवनानगर पायी शहीद आंदोलकांना श्रद्धांजली अर्पण करण्यास येतात. बाळासाहेब शिंदे यांनीही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर मंत्रालयात आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे.