मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आ. नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली आज चुनाभट्टी बीकेसी कनेक्टर फ्लायओव्हरचे लोकार्पण करण्याचे आंदोलन करण्यात आले. दीड महिन्यापासून हा फ्लायओव्हर तयार असूनही वाहनांसाठी खुला नाही. मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नव्हता म्हणून ही दिरंगाई करत लोकांना दीड दीड तास वाहतूक कोंडीत अडकवून ठेवण्याचं पातक प्रशासनाने केला असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
आजच्या आंदोलनानंतर पोलिस आयुक्तांनी आठ दिवसांची मुदत मागून घेतली आहे. सिग्नल यंत्रणेचे काही काम राहिले आहे, असे सांगितले गेले. परंतु आठ दिवसांच्या मुदतीनंतर हा पूल सुरू झाला नाही तर आम्ही अधिक तीव्रतेने पुन्हा आंदोलन करून लोकसहभागाने हा पूल सुरू करू असे नवाब मलिक यांनी पोलीसांना खडसावून सांगितले.
Nawab Malik: Commissioner said that some signal work hasn’t been completed. It’ll be completed within a week. We’ve been assured that the bridge will be opened for public within a week. If it’s not opened within a week, without any announcement we’ll remove the pillars & open it. https://t.co/nmpKmY4tb8 pic.twitter.com/TjHqUQ3OY4
— ANI (@ANI) October 27, 2019