चिंबळी -आळंदी-मरकळ-लोणीकंद रस्त्यावर इंद्रायणी नदीच्या पुलाच्या दुतर्फा रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर सतत जडमालवाहू वाहनांची वर्दळ सुरु असल्याने तुळापूर हद्दीतील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
त्यामुळे नागरिक, प्रवाशांना नाहक कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वीच सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात आले होते; परंतु या परिसरात पडणाऱ्या सततच्या पावसाने रस्त्याच्या दुतर्फा मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.
त्यामुळे किमान पावसाळ्यापर्यंत हे खड्डे बुजवावेत व नंतर नवीन रस्ता करणण्यात यावा, अशी मागणी नागरिक, प्रवाशांमधून जोर धरीत आहे.