मुंबई – भारतात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आज “जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकांकडून या आवाहनाला पाठिंबा मिळत आहे. तसेच बॉलीवुडमधील कलाकारांनीही ट्वीट करत या मोहिमेचे समर्थन केले आहे. मात्र,या जनता कर्फ्यूची अभिनेत्री पूजा बेदी हिने खिल्ली उडवली आहे.
India needs to figure out how to be well prepared (beyond banging pans) to deal with the economic fallout caused by the #CoronavirusOutbreakindia
Will @nsitharaman come up with solutions? Give people a plan? Measures? All other countries seem to have. Why not India? pic.twitter.com/qWpt0Ps8i7— Pooja Bedi (@poojabeditweets) March 20, 2020
पूजा बेदीने ट्विट केले कि “भारताने घरात बसून ताटं वाजवण्यापेक्षा करोनाशी सामना कसा करावा? याबाबत विचार करायला हवा. तसेच होणारी आर्थिक हानी भरुन काढण्यासाठी पुरेशी तयारी करायला हवी. निर्मला सितारामन यांनी एक चांगली योजना घेऊन देशवासीयांसमोर यावं. इतर देश करोनाशी लढण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तयार आहेत. मग भारत का नाही?” अशा आशयाचं ट्विट पूजा बेदी हिने केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून तिने केंद्र सरकारने करोना विषाणूशी लढण्यासाठी केलेल्या तयारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.’ असं म्हणत तिने खिल्लीही उडवली आहे.
तुमच्या कडे काही उपाययोजना असतील तर त्या मोदींना सुचवा..म्हणजे देशाची प्रगती होईल…किंवा तुम्हीच पंतप्रधान व्हा…अकल शून्य…..तुम्हाला कपडे काढणेच जमतं…
रविवारी रंगीत तालीम होती .यापेक्षा कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत.आर्थिक प्रश्न गंभीर होणार आहेतच .पण करोना व्हायरस पसरू नये आणि मनुष्य हानी होऊ नये यासाठी काळजी घ्यायची आहे.पूजा बेदी सारख्यांनी काही चांगलं करता येत नसेल तर निदान गप्प तरी बसावे.