अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या 130 कोटी नागरिकांना जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. विदर्भातील नागरिकांनी या कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. अकोल्यातील रेल्वे स्थानक परिसरात सन्नाटा पाहायला मिळतोय.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी करण्यात आली आहे. विदर्भातील अकोला, नागपूर, मालकापुर तसेच ग्रामीण विभागात देखील जनता कर्फ्यू ला प्रतिसाद मिळतोय.