सिडनी – ऑस्ट्रेलियाविरुद्धची सध्याची टी-20 मालिका टीम इंडियाने जिंकली आहे. रविवारी सिडनी येथे विराट ब्रिगेडने दुसऱ्या टी -20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केले. सलग दोन सामने जिंकून टीम इंडियाने टी-20 सामन्यांत 2-0 अशीविजयी आघाडी घेतली असून या मालिकेचा शेवटचा सामना 8 डिसेंबरला सिडनी येथे खेळला जाईल.
त्यांच्या 11 व्या सामन्यात टीम इंडिया ही अजिंक्य ठरली आहे. हा प्रवास 11 डिसेंबर 2019 पासून सुरू झाला जो आतापर्यंत चालू आहे. यामध्ये, एक सामना अनिर्णीत होता आणि दोन सामने न्यूझीलंडविरुद्ध बरोबरीत होते, जे सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने जिंकले.
11 डिसेंबर 2019 – मुंबई – वेस्ट इंडीज 67 धावांनी विजय
5 जानेवारी 2020 – गुवाहाटी – श्रीलंकेविरुद्ध टाय
7 जानेवारी 2020 – इंदूर – श्रीलंकेवर 7 विकेटने विजय
10 जानेवारी 2020 – पुणे – श्रीलंकेवर 78 धावांनी विजय
24 जानेवारी 2020 – ऑकलंड – न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय
26 जानेवारी 2020 – ऑकलंड – न्यूझीलंवर 7 गडी राखून विजय
29 जानेवारी 2020 – हॅमिल्टन – न्यूझीलंडविरुद्ध टाय (सुपर ओव्हरमध्ये विजयी)
31 जानेवारी 2020 – वेलिंग्टन – न्यूझीलंडविरुद्ध टाय (सुपर ओव्हरमध्ये विजयी)
2 फेब्रुवारी 2020 – माउंट मोंगनूई – न्यूझीलंडवर 7 धावांनी विजय
4 डिसेंबर 2020 – कॅनबेरा – ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय
6 डिसेंबर 2020 – सिडनी – ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय