तामिळनाडू – मकर संक्रांतीच्या सणाबरोबरच तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूलाही सुरुवात झाली आहे. याबाबत प्रशासनालाही सतर्क करण्यात आले आहे. पोंगलपासून पुढील ४ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात रविवारी मदुराईच्या अवनियापुरम भागात सुमारे ६० जण जखमी झाले होते. यातील 20 जण गंभीर जखमी असून, त्यांना राजाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मदुराईचे जिल्हाधिकारी अनिश शेखर यांनी सांगितले की, सर्व जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान आतापर्यंत एकही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही.
पालेमेडू परिसरात जल्लीकट्टू आयोजित केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. जल्लीकट्टू कार्यक्रमादरम्यान ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून बैल आणि खेळात सहभागी होणारे सर्व लोक सुरक्षित असल्याची खात्री केली जात आहे. यासोबतच प्रेक्षकांच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली आहे. जवळपास 2000 पोलीस ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.’