इस्लामपूर (प्रतिनिधी) – जवळची माणसं जाताना पाहून जीव तुटतो. आपण स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या. तसेच समाजाला धीर,आधार द्या असे आवाहन राज्याचे जल संपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी राजारामनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. वाळवा तालुक्यात लोकांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी हेल्प लाईन सुरू करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
पाटील यांनी राजारामनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस, महिला राष्ट्रवादी व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष चिमण भाऊ डांगे, महिला जिल्हाध्यक्षा छाया पाटील, विजयबापू पाटील, सुस्मिता जाधव, संग्राम पाटील, संजय पाटील, विश्वासराव पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, “कार्यकर्त्यांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेत समाजात लोक जागृती करण्यास वेळ द्यावा. आजार अंगावर काढू नका लवकर उपचार सुरू केल्यास निश्चित बरे होवू शकता रोग प्रतिकार शक्ती वाढवा, व्यायामास वेळ द्या, भिऊ नका असे लोकांना सांगा.
जे लोक बरे होवून घरी आले आहेत. त्यांना धीर द्या आपण तालुक्यासह जिल्ह्यात बेड व ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था केली आहे. सध्या कोरोना आटोक्यात आहे. मात्र हॉटेल, एस.टी, रेल्वे सुरू झाल्यावर वाढू शकतो. योग्य खबरदारी घ्या. यावेळी पाटील यांनी तुमच्या भागात कोरोना ची काय परिस्थिती आहे? आपण लोकांना काय मदत केली?अशी विचारणा करीत माहिती घेतली.
तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, महिला तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहराध्यक्षा रोझा किणीकर, नगरसेविका सुनीता सपकाळ, उषा मोरे, मेघा पाटील, कमल पाटील, शैलजा जाधव ,मनीषा पाटील, माया जाधव, उदय पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील आढावा मांडताना काही सूचना केल्या.
यावेळी राज्य चिटणीस भीमराव पाटील, अरुणभाऊ कांबळे, माजी सभापती आनंदराव पाटील, वैभव पाटील, संचालक दादासो मोरे, प्रशांत पाटील, भास्कर पाटील, प्रकाश कांबळे, सुवर्णा पाटील, सुवर्णा जाधव, वैशाली पाटील, अलका माने, नंदाताई पाटील, पुष्पलता खरात, सुनंदा साठे यांच्यासह तिन्ही कार्यकारिणी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरसेविकेची कैफियत व माणुसकी!
इस्लामपूरच्या नगरसेविका सुनीता सपकाळ म्हणाल्या, “मी माझ्या प्रभागातील नागरिकांना जेवढे शक्य आहे. तेवढे सहकार्य व मदत केली. मात्र काही दिवसांनी मी व माझ्या कुटुंबातील काही सदस्य पॉझिटीव्ह आले. तेंव्हा लोक फोन करून कामे सांगायचे मात्र, त्यांनी माझ्या तब्येतीची चौकशी केली नाही. तेंव्हा वाईट वाटले. त्यांची कैफियत व त्यांनी सांगितलेला एक किस्सा ऐकून “कोरोनाने माणुसकी कमी केली” अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.