Sushant Singh Rajput – 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे पश्चिममध्ये एका मोठ्या अभिनेत्याचा मृतदेह सापडल्याची बातमी माध्यमांसमोर आली आणि बॉलिवूड विश्वात एकच खळबळ उडाली. अभिनेत्याच्या खोलीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
हा मृतदेह होता बॉलिवूड अभिनेता ‘सुशांत सिंह राजपूत’चा. मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले, तर कुटुंबीयांनी हत्या झाल्याचा आरोप केला होता. । Sushant Singh Rajput
मुंबई पोलिस, बिहार पोलिस, एनसीबी, ईडी आणि सीबीआय अशा एकूण पाच एजन्सींनी या प्रकरणाचा तपास केला. सीबीआय-ईडीचा तपास अजूनही सुरू आहे. एनसीबीचे प्रकरण न्यायालयात आहे.
यावेळी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह 35 जणांना अटक करण्यात आली होती. चार वर्षे उलटून गेली, पण या प्रकरणात एकही व्यक्ती अद्याप दोषी नाही, ना कोणी तुरुंगात आहे. ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात गेलेले सर्वजण जामिनावर बाहेर आले आहेत.
दरम्यान, अश्यातच ‘केदारनाथ’ आणि ‘काय पो चे’ अश्या चित्रपटांमध्ये काम केलेला दिग्दर्शक अभिषेक कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुशांत विषयी मोकळेपणे व्यक्त झाला. केदारनाथच्या शूटिंगदरम्यान सुशांत सोबत नेमकं घडलं त्याची मानसिक हालत कशी होती या विषयी अभिषेकने अनेक खुलासे केले आहेत.
एका मुलाखतीत बोलताना अभिषेक कपूर म्हणाला की, ‘केदारनाथ या चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलसाठी सारा आणि सुशांतने अत्यंत थंड वातावरणात शूटिंग केलं होतं. त्यांना रात्रभर पावसाचा सीन शूट करायचा होता. । Sushant Singh Rajput
अत्यंत थंडीत रात्रभर भिजत सुशांतने शूटिंग पूर्ण केलं होतं. कामाप्रती असलेली त्याची मेहनत पाहून सारासुद्धा प्रभावित झाली होती..’ असं अभिषेक पुढे म्हणाला. सुशांतने त्याची सुरुवात केली होती. त्याने पूर्णपणे भिजून शूटिंग करण्यास सुरुवात केली होती.
आणि दुसऱ्या दिवशी सारासुद्धा त्याच्याकडे पाहून पूर्ण मेहनतीने काम करू लागली होती. सुशांतमुळे तिने चित्रपटासाठी अधिक मेहनत घेतली होती. पण सुशांत त्या दिवसांत अस्वस्थ होता.
तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तसा खूप स्ट्राँग होता. पण मनातल्या मनात कोणती तरी गोष्ट त्याला सतावत होती. तो स्वत:ला सर्वांपासून दूर नेत होता..’ असा खुलासा अभिषेकने केला. । Sushant Singh Rajput