मुंबई – अभिनेता सुबोध भावेच्या ‘बालगंधर्व’ चित्रपटाला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. यात सुबोध भावे स्त्री वेशात पाहायला मिळला होता. त्याने साकारलेल्या या भूमिकेचे खूप कौतुकही झाले होते. मात्र या चित्रपटाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुबोधने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता सुबोध भावेने इंस्टाग्रामवर बालगंधर्व सिनेमातील फोटो शेअर करत लिहिले की, आज 12 वर्षे झाली “बालगंधर्व” चित्रपट प्रदर्शित होऊन. सुबोधच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तर निर्माता-दिग्दर्शक रवी जाधवने कमेंटमध्ये लिहिले की, ‘अप्रतिम आठवणी’.
View this post on Instagram
नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच, “बालगंधर्व’ हे नाव उच्चारताच मराठी मन अभिमानाने, आदराने भरून जाते. त्यांना न पाहिलेल्या, न एकलेल्या माणसांनाही बालगंधर्व म्हणजे एक स्वर्गीय कल्पना, विस्मयानंद देणारी दैवी आकृती वाटावी, यातच त्यांचे सारे कर्तृत्व सामावले आहे. बालगंधर्व हे विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. हीच भूमिका सुबोध भावाने रुपेरी पडद्यावर अचूक साकारली होती. अभिनेता सुबोध भावेचा ‘बालगंधर्व’ हा सिनेमा 2011 साली रिलीज झाला होता.