नवी दिल्ली – समाज माध्यमे उत्तरदायी असणे गरजे असून त्याबाबत राजकीय एकमत झाल्यास कठोर कायदे आणता येतील, असे माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितले.
यासंदर्भात पुरवणी प्रश्नांच्या मालिकांना उत्तर देताना वैष्णव म्हणाले, समाज माध्यमांवर सरकारने कोणतेही पाऊल उचलले की विरोधकांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात असल्याची टीका केली जाते. पण, प्रत्यक्षात तसे नाही.
भारतीय जनता पक्षाचे सुशील कुमार मोदी यांनी मुस्लीम महिलांची बदनामी करणाऱ्या बुलीबाय सारख्या वेबसाईटवर कोणती कारवाई केली या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ज्यावेळी असे उल्लंघन झाल्याचे सरकारच्या नजरेस येते त्यावेळी सरकार तातडीने कारवाई करते.
आपल्या महिला आणि भावी पीढीच्या सुरक्षेसाठी समाजमाध्यमांना उत्तरदायी ठरवण्यासाठी एकमत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी समाज माध्यमांचे कायदे कठोर करावे लागतील. त्यावर जर विरोधक अभिव्यक्ती स्वांत्र्याची गळचेपी केल्याचा आरोप करणार असतील तर ते चुकीचे ठरेल, असेही वैष्णव म्हणाले.
जर सभागृहाचे एकमत होणार असेल तर आम्ही समाजमाध्यमांवर आणखी कठोर निर्बंध असणारे कायदे आणूमला व्यक्तीश: विश्वास आहे की आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण आणखी कठोर कायदे केले पाहिजेत.