मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. एकीकडे उच्च न्यायालयाने संप थांबविण्याचा आदेश दिलेला आहे, तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.
आता रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता आहे. कारण, रत्नागिरी जिल्ह्यातील 28 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. या कारवाईनंतर निलंबीत कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने या बद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्यभरातील 16 विभागातील 45 आगारामधील 376एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.