मुंबई – ‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.
दरम्यान, त्यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी शेअर सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. यातच करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही फोन करुन प्रोत्साहन दिलं होतं. मुख्यमंत्र्यांना सिंधुताईंनी केलेल्या या कॉलची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती.
सिंधुताई आपल्या प्रेमळ बोलण्याने समोरच्याला पटकन आपलंसं करुन घ्यायच्या. लहान थोरांपासून सर्वांनाच त्या आपलं लेकरु मानायच्या. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही फोन करुन प्रोत्साहन दिलं होतं. मुख्यमंत्र्यांना सिंधुताईंनी केलेल्या या फोन कॉलची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती.