बारामती -बारामती शहर व तालुका सील केल्यानंतर गावे देखील बंद होऊ लागली आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर बंदला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी ग्रामस्थांच्या वतीने बंदचे आवाहन केले होते. ग्रामस्थांनी दुकाने, मच्छी, चिकन, मटण मार्केट बंद ठेवून पाठिंबा दिला. तीन दिवसांसाठी हा बंद आहे.
यावेळी बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, खेडकर, तलाठी संजय खाडे, ग्रामविकास अधिकारी कारंडे हे हालचालीवर लक्ष ठेवून होते.
पाणीपुरवठा सुरळीत राहावी यासाठी माजी सरपंच गणपत देवकाते, सुनील देवकाते, हेमंत देवकाते, सुरेश निकाळजे, संजय खुडे, श्रीधर हरीयर, विलास व्यवहारे आदींनी बंद यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.