Shushma Andher on Fadnavis । शिवसेना ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा ठाण्यात पोहचली. त्यावेळी सुषमा अंधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केलीय. यावेळी सुषमा अंधारे यांनी, ठाणे हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला आहे. योगायोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे राहतात”असा खोचक टोला लगावला. त्यासोबतच त्यांनी आपल्या भाषणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावृद्धी निशाणा साधलाय.
माकडचाळे करणारे लोक आजूबाजूला Shushma Andher on Fadnavis ।
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राचा गुन्हेगारी दर वाढला आहे. सगळ्यात जास्त गुन्हेगारी दर हा ठाणे आणि कल्याण मध्ये आहे. मी हा आरोप माझ्या मनाने करत नाही. मला हे विविध जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या वकिलांनी सांगितलं आहे. हे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. त्यादिवशी माझ्या सभेत माकड आलं त्याची बातमीही झाल्याचं मी वाचलं. मला कुणीतरी विचारलं माकडांची भीती वाटते का? मी त्यांना म्हटलं माकडचाळे करणारे लोक आजूबाजूला असताना मला कशाला माकडांची भीती वाटेल? असे म्हणत सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
पंकजा मुंडे यांचं राजकारण तुम्ही संपवलं Shushma Andher on Fadnavis ।
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी लावण्यापेक्षा अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केलं जात होतं त्या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावली पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. तसंच मराठा आणि ओबीसी अशी भांडणं लावू नका. ज्या गोपीनाथ मुंडेंची बॅग घेऊन देवेंद्र फडणवीस फिरायचे त्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे यांचं राजकारण संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तुम्ही ओबीसींचेही नाहीत हे आम्हाला कळलं आहे. तसं असतं तर विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांचं राजकारण तुम्ही संपवलं नसतं. कधी काळी तुमच्या गळ्यातला ताईत असलेल्या आशिष शेलारांना साईडलाईन केलं नसतं. तुमच्या लाडक्या गँगमध्ये प्रसाद लाड आणि नवीन लोकांची भरती तुम्ही केली आहे. असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.