Bhavli Dam । Nashik – इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात ५ जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन यात ३ मुली व २ मुलांचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार दि. २१ नाशिकरोड येथील गोसावी वाडीतील एकाच कुटुंबातील काही जण भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते.
सायंकाळच्या सुमारास यातील काही तरुण आंघोळीसाठी धरणात उतरले असता बुडत असल्याचे पाहुन त्यांना वाचवण्यासाठी इतर तीन जणांनी पाण्यात उड्या मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांना वाचवण्याच्या नादात हे सर्वच पाच जण बुडाले.अनस खान दिलदार खान, नाझिया इमरान खान, मीजबाह दिलदार खान, हनीफ अहमद शेख आणि ईकरा दिलदार खान अशी मृतांची नावे आहेत.
दरम्यान, पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी घटनास्थळी धाव घेवुन मदतकार्य करत हे सर्व मृतदेह इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. या घटनेमुळे गोसावीवाडीत शोककळा पसरली असुन नातेवाईकांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती.