पाटना – शेकडो प्रवाशांनी भरलेल्या बोटीचा हायटेंशन तारेशी संपर्क आला. ज्यात बोटीत बसलेल्यांना धक्का जाणवला. या घटनेत अनेकजण भाजल्याचे समजतं. याची सूचना मिळताच एसडीआरएफ, एनडीआरएफसह पोलिसांनी टीम घटनास्थळी पोहोचली.
बिहारमध्ये शनिवारी रात्री उशिरा रुस्तमपूरच्या दिशेने एक बोट निघाली होती. यातून शेकडो लोक प्रवास करत होते. मात्र जशी बोट गंगेत पोहोचली तसा बोटीचा हायटेंशन तारेशी संपर्क आला. ज्यात बोटीत बसलेल्यांना धक्का जाणवला. त्यानंतर अनेकांनी जीवाच्या अकांताने बोटीच्या बाहेर उडी मारली.
या अपघातात 38 जणं जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, 3 जणं बेपत्ता आहेत. स्थानिक दुसरी बोट घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केलं. तर बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे.