मुंबई – राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका ( grampanchayat election result ) झाल्या. या निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा पटकावल्याचा दावा फडणवीस आणि अन्य मंडळींनी केला होता. पण हा दावा नेमकी आकडेवारी सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( sharad pawar ) यांनी खोडून काढला आहे.
आज येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की विविध जिल्ह्यांतून आम्ही निकालाची नेमकी आकडेवारी घेतली. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजप पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसला 608 पैकी 173 ग्रामपंचायतीत विजय मिळाला असून भारतीय जनता पक्षाला 168 जागी यश मिळाले आहे. ( ncp tops in grampanchayat election result )
कॉंग्रेसला 84 तर शिंदे गटाला 42 ठिकाणी यश मिळाले आहे. शिवसेनेला नेमक्या किती ग्रामपंचायती मिळाल्या याची नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही असे ते म्हणाले. महाविकास आघाडीला मिळालेल्या जागांचा एकत्रित विचार केला तरीही महाविकास आघाडीने भाजप-शिंदे गटावर मात केली आहे असे त्यांनी नमूद केले. ( grampanchayat election result )
ते म्हणाले की, महाविकास आघाडीला एकूण 277 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळाली आहे, तर भाजप-शिंदे गटाला 210 ग्रामपंचायतीत सत्ता मिळाली आहे. फडणवीस व अन्य भाजप नेत्यांचा दावा पवारांनी नेमकी आकडेवारी देऊन खोडून काढल्यानंतर आता भाजपचे नेते त्याला काय उत्तर देतात या विषयी उत्सुकता आहे.