चिंबळी गावच्या जडणघडणीत गेल्या दशकापासून सुरू झालेला हा शांताई परिवाराचा प्रवास शिक्षण क्षेत्रापासून सुरू होऊन बॅंकिंग क्षेत्रापर्यंत सुरू झालाय. सन 2010 च्या सुरुवातीला सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले जैद परिवारातील मुख्य घटक उद्योजक श्री. संजयशेठ दगडू जैद यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली अनुराग संजयशेठ जैद यांनी जैद पाटील एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शैक्षणिक सेवा पुरवण्यासाठी संजयशेठ जैद पाटील यांच्या मातोश्री आणि अनुराग जैद यांच्या आजी शांताबाई ज्यांनी आपले आयुष्य जि.प. प्राथमिक शाळेच्या आदर्श शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका म्हणून घालवले व अनेक विद्यार्थी घडवले.
कै. शांताबाई दगडू जैद यांच्या स्वप्नासाठी त्यांच्याच नावाने शांताई मेमोरियल स्कूल व ज्युनियर कॉलेजची सुरुवात झाली. ग्रामीण भागात दर्जेदार इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू होऊन कमीत कमी खर्चात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण पंचक्रोशीत मिळावे याच उद्देशाने शांताई स्कूल काम करायला लागले. शांताई स्कूलमधून अनेक विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च स्वतः श्री. संजयशेठ जैद यांनी करून गरिबांची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकली पाहिजे, हाच उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि आजही तो प्रवास तसाच सुरू आहे. आजकालच्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले असताना शैक्षणिक संस्थांमधून नफा कमवणे हा उद्देश कधीच संस्थेचे संस्थापक श्री. संजयशेठ जैद व संस्थेचे अध्यक्ष श्री. अनुरागशेठ जैद यांनी ठेवला नाही. ही एक सेवा आहे असंच समजून अत्यल्प फीमध्ये आज संस्था काम करत आहे. श्री .अनुराग जैद हे स्वतः एक सिव्हिल इंजिनीयर तसेच बॅचलर ऑफ आर्ट असे पदवीधर असून, शिक्षणाची आस व आवड त्यांच्या अंगी असल्यामुळे शिक्षणाचे महत्व चांगलेच जाणून आहेत.
जैद पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आजवर वेगवेगळे प्रयोग आपल्या शाळेमध्ये सुरू ठेवले गेले. यामध्ये विनादप्तर शाळा, ऍक्टिव्हिटी बेस एज्युकेशन, डिजिटल स्कूल अशा माध्यमांतून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम संस्था करत आहे. सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण पद्धतीमध्ये संस्था आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे.
तसेच पालकांची मागणी पाहता संस्थेने गेल्या वर्षीपासून सेमीइंग्लिश माध्यमाची शिशू वर्ग ते 12वी पर्यंतची शाळा सुरू केली आहे. त्याला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सेमीइंग्लिश शाळेलासुद्धा इंटरनॅशनल स्कूलच्या धर्तीवर सुरू करून त्याच पद्धतीचे विद्यार्थी घडवण्याचा मानस अनुराग जैद यांचा आहे.
या स्पर्धेच्या युगात शांताई स्कूल व कॉलेजचा विद्यार्थी चमकेल. तो आपल्या वेगळेपणाने यशस्वी होईल याकडे खास करून काम हे संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. संस्थेत सध्या कार्यरत असलेल्या शाळेच्या कार्याध्यक्षा स्वाती अनुराग जैद व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रिया बवले व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षिका व सर्व कर्मचारी परिवार हा प्रत्येकवेळी आपल्या संस्थेचे नाविन्य जपण्याचे व वेगळेपणा दाखविण्याचे काम नेहमीच करत असतात. या शांताई परिवाराच्या माध्यमातून संजयशेठ जैद तसेच अनुराग जैद यांनी गेल्या दोन वर्षांपासून शांताई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची स्थापना करून तालुक्यातील तरुणांना, उद्योजकांना तसेच नोकरदार वर्गाला पतपुरवठा करून तसेच इतर वित्तीय सेवा पुरवण्याची सुरुवात केली.
अल्पावधीतच कार्यकुशल, सुशिक्षित व समाजाभिमुख असणाऱ्या सर्व संचालक व सल्लागार मंडळामुळे आपली दूरदृष्टी आणि पारदर्शक, कुशल कार्यपद्धतीच्या बळावर संस्थेने ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न करत असून इतरांपेक्षा वाढीव असणाऱ्या व्याजदरामुळे व घरपोच व्याज पुरवण्याच्या सुविधांमुळे पतसंस्था अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. संस्थेने सुरू केलेल्या शांताई मंगल ठेव योजना, गंगोत्री ठेव योजना, शांताई पेंशन योजना, दामदुप्पट योजना आदी लोकप्रिय ठरत आहेत.
या डिजिटल युगात ग्राहकांना एटीएम सुविधा देणारी एकमेव पतसंस्था बनण्याचा मान शांताई पतसंस्थेने मिळवला. तसेच मोबाईल बॅंकिंग, आरटीजीएस, एनईएफटी सुविधा, डिजिटल बॅंकिंग अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत ग्राहकांना पारदर्शी व्यवहार पुरवण्याचे काम संस्था वेळोवेळी करत आहे. त्यामुळे अल्पावधीतच हजारो व्यावसायिकांनी दैनंदिन ठेवींच्या माध्यमातून पतसंस्थेशी नाळ जोडली आहे. त्यामुळे व्यावसायिकांच्या पसंतीची व विश्वासू अग्रगण्य संस्था अशी ओळख संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयशेठ जैद व संस्थेचे संस्थापकीय संचालक अनुराग जैद यांचे माध्यमातून संस्थेने यशस्वीरित्या केली आहे. याच बरोबर डेक्कन पुणे येथे जैद परिवाराच्या माध्यमातून आयटी प्रनर डाटा सिस्टीम प्रा. लि. ही आयटी क्षेत्राशी निगडित असणारी इन्स्टिट्यूट आयटी क्षेत्राशी निगडित असणाऱ्या विविध पदवीधरांना नोकरीसाठी लागणारे विविध कोर्सेसचे ट्रेनिंग आणि त्यांच्या इन्स्टिट्यूट मधून कोर्स पूर्ण करणाऱ्याला 100% नोकरीची हमी संस्थेकडून दिली जाते.
संजयशेठ जैद यांनी स्वतः कष्टातून चिंबळीमध्ये सर्वप्रथम लघुउद्योजकांसाठी संजयशेठ जैद पाटिल उद्योगनगरीची निर्मिती करून अनेक कंपन्यांना जागा उपलब्ध करून दिली त्यामधून शेकडो तरुणांना रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध झाले .तसेच अनेक शून्यातून व्यवसाय सुरु करणारे लघु उद्योजक तयार होऊन अनेकजण त्यांच्या यशोशिखरावर पोहचले.ते आजही संजयशेठ जैद यांना ऋणी मानतात.
अशा शांताई परिवाराच्या माध्यमातून एक व्यावसायिक, पाऊल म्हणून चिंबळी फाटा येथे शांताई लॉन्स गार्डन मंगल कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या नवीन व्यवसायाबरोबरच शांताई परिवाराच्या माध्यमातून बदलत्या काळानुसार व लोकांच्या गरजेनुसार आणखी नव्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा मानस हा संजयशेठ जैद व उद्योजक अनुराग जैद यांचा आहे.