नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्या, मंगळवापासून नियमित सुनावणी होणार आहे. हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे पाठविण्याचे मंजूर झाले तर मग निकाल येण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागेल. आज सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देणार याकडे शिवसेनेच्या दोन्ही गटासह संपूर्ण देशाच लक्ष लागले आहे. हे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे न पाठविल्यास अंतिम निर्णय देईल.
शिंदे गट आणि शिवसेनेची याचिका ही लिस्ट झाली असून सकाळी 10.30 वाजता सुनावणीला सुरुवात झाली आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापिठापुढे होणार आहे. या घटनापीठात न्या. शहा, न्या. मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. नार्सिंमा यांचा समावेश आहे.
दरम्यान,यावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलतांना भाष्य केले आहे, उज्ज्वल निकम म्हणाले,’सध्या सत्तासंघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर केली जात आहे. ही सुनावणी पाच ऐवजी सात सदस्यीय घटनापीठासमोर व्हावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीवरच आधी सुनावणी घेतली जाईल. शिवसेनेची मागणी सुप्रीम कोर्टाकडून मान्य होते की नाही.
ते पुढे म्हणाले, ठाकरे गटाकडून ७ सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. नाबाम रबियाचा निकाल ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिला होता. मात्र घटनेच्या १० व्या परिशिष्टाच्या मूळ नियमाच्या विसंगत आहे. फेरविचार करायचा असेल तर ७ न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन केलं पाहिजे, अशी मागणी शिवसेनेची आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत आधी याविषयी निर्णय घेतला जाईल.’