मुंबई – निवडणूकीच्या तोंडावरच राज्य सरकारने अशासकीय खाजगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करून त्यांनाही खूश केले आहे. शालेय शिक्षण मंत्री ऍड.आशिष शेलार यांनी आज ही घोषणा केली. 1 जानेवारी 2016 पासून त्यांना आयोग लागू केला जाणार असून याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
राज्यात 1012 अर्धवेळ शिक्षक, 1431 अर्धवेळ ग्रंथपाल तसेच 165 रात्र शाळांमधे काम करणारे, 630 रात्र शाळा शिक्षक, 219 शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. या सर्वांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय मंत्री ऍड आशिष शेलार यांनी घेतला. राज्यातील अशासकीय खाजगी शाळांतील पूर्णवेळ कर्मचाछयांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता.
तसेच अनुदानित व महापालिका, नगरपालिका शाळांमधील शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र अशासकीय खाजगी शाळांतील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल व रात्र शाळेचे शिक्षकांचा निर्णय प्रलंबित होता.
शिक्षण सेवक मानधन वाढवले आहे का अजून 6000 रुपये आहे?