साउदम्पटन | अंतिम सामन्याचे यजमानपद साउदम्पटनला देण्याच्या आयसीसीच्या निर्णयावर भारताचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागने टीका केली आहे.
उर्वरित दोन दिवसांत प्रत्येकी 98 षटकांप्रमाणे जास्तीत जास्त 196 षटकांचाच खेळ होऊ शकतो. मात्र, त्यासाठी पावसाने विश्रांती घ्यायला हवी. तरीही त्यात निकाल लागणे शक्य वाटत नाही.
अशा स्थितीत भारत आणि न्यूझीलंड यांना संयुक्त विजेतेपद देण्यात येईल. इंग्लंडमध्ये या काळात कसे वातावरण असते हे आयसीसीला चांगलेच अवगत आहे. मग हा सामना येथे का आयोजित केला गेला, असा सवालही सेहवागने केला आहे.