मायणी – खटाव तालुक्यातील १६ व माण तालुक्यातील २४ गावे अशी ४० गावे तारळी प्रकल्पावर अवलंबून आहेत मात्र केवळ १७४ मीटर म्हणजेच जवळपास ५०० फूट एवढेच तारळी प्रकल्पाचे काम बाकी असून ते १७४ मीटर राहिलेले क्षेत्र जिल्हाधिकाऱ्यानी सक्तीने भूसंपादन करून हा प्रश्न निकाली काढल्यास या ४० चाळीस गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याने या प्रकल्पासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठा लोकलढा उभा करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मायणी येथील झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, प्रदेश युवा सरचिटणीस सूर्यभान जाधव, खटाव माण संपर्कप्रमुख शरद खाडे, खटाव तालुका अध्यक्ष दत्तूकाका घार्गे, स्वाभिमानी पक्षाचे वैभव पाटील, सचिन पवार,संघटक संतोष तुपे, तुषार कंड्रे, बाबासाहेब यलमर, सुनिल यलमर, अनिल कचरे आदी उपस्थित होते.
तारळी योजना २००७ साली बांधून पूर्ण झाली त्याचबरोबर आज अखेर या योजनेच्या अनेक दुरुस्त्या झाल्या मात्र केवळ 174 मीटर भूसंपादन क्षेत्र राहिल्यामुळे खटाव व माण तालुक्यासाठी प्रत्येकी ४४३८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यापासून वंचित राहत आहे हे राहिलेले १७४ मीटर क्षेत्र जिल्हाधिकारी यांनी सक्तीने भूसंपादन करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठा लोकलढा उभा करणार आहे खटाव तालुक्यात जवळपास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ३६ शाखा आहेत केवळ लोकांनी यात सहभागी व्हावे असेही आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे
तारळी प्रकल्प मोठ्या क्षमतेने वापरास भेटला तरच खटाव माण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी संपतील.राज्यामध्ये इतरत्र सर्वत्र कोट्यावधींची कामे सुरू आहेत मात्र तारळी प्रकल्पाकडेच दुर्लक्ष केले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना याच आठवड्यात भेटून त्यांच्याशी विचारविनिमय करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यासाठी लोकांनी या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे.