पुसेगाव – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीला अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रीय स्वराज्य सेनेला महायुतीतील घटक पक्ष म्हणून सहमती देण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष ॲड. श्रीहरी बागल यांनी दिली.
ॲड. बागल अनेक वर्षे महाराष्ट्रातील राजकारणात काम करत असून मराठा समाजासह शेतकरी व कष्टकरी यांच्या प्रश्नावर काम करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व प्रतोद आमदार प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात दौरे सुरु केले आहेत, असे त्यांनी सांगितले.
===============