कोरेगाव, (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनावेळी नवी मुंबईत मराठा समाजबांधवांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करून, विशेष काळजी घेणार्या आमदार शशिकांत शिंदे यांचा आरक्षणाच्या लढ्याचे मुख्य प्रवर्तक मनोज जरांगे-पाटील यांनी नुकताच गौरव केला. मुंबईतील आंदोलनात जरांगे-पाटील यांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण राज्यातून मराठा समाजबांधव आले होते.
हे आंदांलक मुंबईत प्रवेश करण्यापूर्वी राज्य सरकारने नवी मुंबईतच चर्चेच्या फेर्या सुरू केल्याने समाजबांधव तेथे थांबले होते. त्या कालावधीत शासकीय यंत्रणेवर ताण असताना, मराठा समाजबांधवांची चांगली व्यवस्था करण्यात आमदार शशिकांत शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या नेतृत्वाखाली टीमने परिश्रम घेऊन, आंदोलकांना सर्व सोयीसुविधा पुरवल्या होत्या. त्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. जरांगे-पाटील यांनी आमदार शिंदे यांना धन्यवाद दिले असून, त्यांचे योगदान विसरता येणार नसल्याचे सांगितले.