कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता शिरूर) सरंपच परिषद मुंबई महाराष्ट्र ने पुकारलेल्या ग्रामपंचायत बंदला ग्रामपंचयतींनी पाठिंबा देत असून यामध्ये उद्योगनगरी सणसवाडी येथील ग्राम पंचायतीच्या सरपंच तथा सरपंच परिषदेच्या महिला पुणे जिल्हाध्यक्ष सुनंदा नवनाथ. दरेकर यांच्यासहित सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पाठिंबा देत सणसवाडी ग्राम पंचायत बंद ठेवण्यात आली होती.
सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी सरकारकडे १८ मागण्याचे निवेदन दिले होते यामध्ये पंधराव्या वित्त आयोग हा शाश्वत विकासावर खर्च करावा त्यात कपात करण्यात येऊ नये,
राज्यात ग्रामपंचायत मध्ये पॅनल बंदीचा कायदा करावा, पिण्याच्या पाण्याच्या योजनाच्या लाईट बिलांची
दुरूस्ती करावी, नवी मुंबईत सरपंच भवन बांधावे,पंचवीस पंधराचा निधी शिफारशीवर न देता गावची
लोकसंख्या व गरजेवर देण्यात यावा, संगणक परिचालक हा ग्रामपंचायतचा कर्मचारी समजण्यात यावा ,
प्रत्येक विभागातून सरपंच पिरषदेचा एक विधानसभेवर आमदार नियुक्त करावा, सरपंच, उपसरपंच यांच्या
मानधनात वाढ करावी, कोरोना काळात निधन झालेल्या सरपंचाच्या कुटूंबियांना मदत करावी, सातारा
तालुक्यातील पाच ग्रामपंचायत चे खाते बंद केले ते पुन्हा सुरू करावे या सह इतर मागण्या केल्या होत्या मागण्यावर लक्ष वेधण्यासाठी राज्यभर ग्रामपंचात बंद ठेवत असल्याचा इशारा देण्यात आला होता. यामुळे या आंदोलनास सक्रिय पाठिंबा देण्यासाठी सणसवाडी ग्राम पंचायत बंद ठेवत आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.
कोरोना मुळे ग्रामपंचायतींचे उत्पन्न घटले , वीज बिल, गावचा विकास, कार्यालयीन कामकाज खरच, पायाभूत सुविधा यांच्यावरील खर्चासाठी सर्वच बाबतीत अवघड व बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शासनाने या बाबत सकारात्मक विचार करून या मागण्या मान्य कराव्यात ही शासनाला विनंती आहे.
– सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, महिला जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद