मुंबई: सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच आमदार फोडाफोडीच्या प्रकरणावरुन भाजप आणि शिवसेना दोन्हीदेखील सावध पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे. आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून शिवसेनेकडून आमदार मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्याची बाब समोर आली होती. त्यावरूनच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘तुमचं ते गेटटुगेदर आणि आम्ही आमदारांना बाजू घेऊन गेलो. मूर्ख लोकं आहेत’, अशा शब्दात भाजपवर टीका केली आहे. ते आज सकाळी माध्यमांशी बोलता होते.
म्हणून आमदारांना एकत्र ठेवले..
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, आमदार लांब राहतात त्यांना काही सूचना द्यायच्या असतात. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या मतदान पतिक्रिया ह्या तांत्रिक स्वावरूपाच्या असतात. त्यामुळे आमदारांना काही सूचना द्यायच्या असतात. म्हणून आमदारांना एकत्र ठेवले जाते असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पुढे ते म्हणाले , भाजपनेही ठेवले आहे. काँग्रेस ,राष्ट्रवादी हे देखील ठेवतात त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण करावे काय ? असा सवाल करत ते पुढे म्हणाले “तुमचं ते गेटटुगेदर आणि आम्ही आमदारांना बाजू घेऊन गेलो. मूर्ख लोकं आहेत, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.
आघाडीच्या चारही जागा निवडून येतील
शिवसेनेमध्ये धुसफूस आहे का ? असा सवाल केल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून येतील. आघाडीच्या चारही जागा निवडून येतील असे सांगितले. 10 तारखेला संध्याकाळी 8 वाजता निकाल स्पष्ट झालेला असेल, असे ते म्हणाले. क्रॉस व्होटिंगचा प्रश्नच नाही. मत दाखवावंच लागतं. खुलं मतदान आहे. इलेक्शन एजंट किंवा चीफ व्हीपला मतदान दाखवावं लागतं. कदाचित हा नियम अपक्षांना लागू होत नसेल. आघाडीचे सर्व आमदार ठाम आहेत. आमच्यासोबत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.