Sam Pitroda on Inherited Wealth। देशात सध्या मंगळसूत्र आणि मालमत्तेच्या मुद्दयावरून राजकीय खळबळ उडाली आहे. यासर्वात इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी देशात वारसा संपत्तीवर कर लावण्याचे मोठे विधान केले आहे. अमेरिकेतील शिकागो येथे मालमत्ता वितरणाबाबत वक्तव्य केलंय.
मृत्यूनंतर अर्धी मालमत्ता जनतेसाठी सोडा Sam Pitroda on Inherited Wealth।
सॅम पित्रोदा यांनी वारसा संपत्तीवर बोलताना, “हा एक अतिशय मनोरंजक कायदा आहे. या अंतर्गत, तुम्ही तुमच्या आयुष्यात भरपूर संपत्ती कामवाली. परंतु, तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही तुमची संपत्ती लोकांसाठी सोडली पाहिजे, अशी तरतूद आहे. संपूर्ण मालमत्ता नाही तर अर्धी, जी मला योग्य वाटते. पण भारतात असा कोणताही कायदा नाही. जर येथे कोणाची संपत्ती 10 अब्ज रुपये आहे. त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या मुलांना त्याची सर्व मालमत्ता मिळते, लोकांसाठी काहीही देण्यात येत नाही. मला वाटते की लोकांनी अशा विषयांवर चर्चा केली पाहिजे. या चर्चेतून काय निष्पन्न होईल माहीत नाही. आम्ही नवीन धोरणे आणि नवीन कार्यक्रमांबद्दल बोलत आहोत, जे केवळ श्रीमंतांच्या हिताचे नसून लोकांच्या हिताचे असले पाहिजेत.” असे त्यांनी म्हटले.
#WATCH | Chicago, US: Chairman of Indian Overseas Congress, Sam Pitroda says, “…In America, there is an inheritance tax. If one has $100 million worth of wealth and when he dies he can only transfer probably 45% to his children, 55% is grabbed by the government. That’s an… pic.twitter.com/DTJrseebFk
— ANI (@ANI) April 24, 2024
पुढे बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले की, “राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात श्रीमंतांच्या संपत्तीच्या वाटपाचा उल्लेख नाही. उलट संपत्तीचे समन्यायी वाटप होईल, असे धोरण काँग्रेस पक्ष करेल, असे म्हटले आहे. जेव्हा तुम्ही संपत्तीच्या वाटणीबद्दल बोलतो तेव्हा असे नाही की तुम्ही बसून म्हणता की माझ्याकडे इतके पैसे आहेत आणि मी ते सर्वांमध्ये वाटून देईन. असा विचार करणे निरुपयोगी आहे.
‘त्यांनी’ देश उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतलाय Sam Pitroda on Inherited Wealth।
सॅम पित्रोदा यांनी इनहेरिटन्स टॅक्सबाबत मोठे वक्तव्य केले असून त्यावरून आता वाद निर्माण झाला. त्यांच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक झालीय. भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय म्हणाले की, काँग्रेसने देश उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सॅम पित्रोदा 50 टक्के वारसा कराची वकिली करत आहेत. म्हणजे काँग्रेस सत्तेवर आली तर लोकांनी कष्टाने कमावलेली पन्नास टक्के संपत्ती हिरावून घेतली जाईल. याशिवाय आपण जो काही कर भरतो त्यातही वाढ होईल.”असे त्यांनी म्हटले.