मुंबई – ‘चला हवा येऊ द्या’ या मराठी शोमुळे घराघरात पोहचलेल्या अभिनेता सागर कारंडेवर संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो. सागरने आपल्या विनोदाच्या आतिषबाजीने प्रेक्षकांना भरभरून हसवले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासुन हास्यविर सागर कारंडे हा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर दिसत नाही. त्यामुळे त्याचे चाहते काहीसे नाराज असल्याचं दिसून येत आहे.
त्याने साकारलेले महिला पात्र असो किंवा पोस्टमन, त्याचे गारुड प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिले आहे. गेले कित्येक दिवस तो दिसत नसल्याने सागरने ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सोडला अशी चर्चा आहे. त्याची पोस्टमन काकाची जागा ‘श्रेया बुगडे’ने घेतली आहे. त्यामुळे आता सागर कारंडेने या मालिकेतून पूर्णपणे एक्सिट घेतल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रे सागर कारंडेने आपल्या भावनिक शैलीत सादर केले आहेत. त्यामुळे हास्याच्या मंचावर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम सागरने केले आहे. आणि त्यामुळेच हा कार्यक्रम घराघरातील अविभाज्य घटक बनला आहे. दरम्यान, सध्या सागर कारंडे हा ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहचला आहे.