भिगवण, (वार्ताहर) –बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी येथील प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत कामगार आमरण उपोषणाला बसलेले असून पंधरा दिवस होऊनही निर्णय होत नाही. त्यामुळे उपोषण करणारे कामगार यांची प्रकृती खालावलेली आहे. असे असतानाही 15 दिवस होऊनही बिल्ट कंपनी, माथाडी बोर्ड यांनी दखल घेतलेली नाही त्यामुळे प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगार यांचेमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. शासनाकडून गोरगरीब कामगारांना तात्काळ नियुक्ती पत्र देणेत यावीत या मागणीसाठी येथील पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी पराग जाधव, तानाजी वायसे, नानासाहेब बंडगर, राजकुमार मस्कर, चंद्रकांत भोई, शरद चीतारे, छगन वाळके, विशाल धुमाळ, हर्षवर्धन ढवळे, सुभाष फलफले, नामदेवराव जगताप, सुनील काळे, गुरप्पा पवार, प्रशांत गायकवाड, अनेक कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते. कामगारांना लेखी नियुक्तीपत्र माथाडी बोर्डाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. याबाबतचे निवेदन मंडल अधिकारी लोणी देवकर यांनी स्विकारले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.