नागरिकांमध्ये करोना व्हायरसची भीती ः खबरदारीचे आवाहन
मंचर- आंबेगाव तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या मंचर शहरातील व्यवहार करोना व्हायरसच्या भीतीमुळे थंडावले आहेत. बाहेर गावाहून नागरिक खरेदीसाठी येत नसल्याने रस्ते ओस पडले आहेत.
याबरोबरच सलून व्यावसायिकांनी ग्राहकांची सेवा करताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंचर येथे अनेक कारणांसाठी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या खूप असते. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामपंचायतीने आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल आणि इतर दुकानेही ओस पडू लागली आहेत. या व्हायरसच्या भीतीमुळे येथील व्यवसायावर परिणाम झाला आहे. गावातील सण, उत्सव, यात्रा रद्द झाले आहेत.
- उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून करोनाविषयी जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालय आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी सज्ज झाले आहे.नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. आवश्यक ती खबरदारी प्रत्येक नागरिकांनी घेतली तर करोनाचा समूळ नायनाट होऊ शकतो. नागरिकांनी घाबरून न जाता त्याचा प्रतिकार करणे हाच एकमेव उपाय असून त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे आवाहन ाच्या
-डॉ. चंदाराणी पाटील, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मंचर
करोना व्हायरसचा परिणाम सर्व व्यवसायावर झाला आहे. यामुळे करोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये, म्हणून सलून व्यवसायिक खबरदारी घेत आहेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या चुकीच्या बातम्यांवर अथवा पोस्टवर विश्वास ठेवू नये, या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलून व्यवसायिक साफसफाईकडे प्राधान्याने लक्ष देत आहे
– श्रीराम क्षीरसागर, सलून व्यवसायिक, मंचर यांनी दिली.