बेंगळूरु : बातम्यांची सत्यता तपासण्याचे कौशल्य असणाऱ्या पारंपरिक माध्यमांनी, समाजातल्या आपल्या भूमिकेसंदर्भात आत्मपरीक्षण करावे आणि वाचकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी मार्ग शोधायला हवेत असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे.
ते आज बंगळुरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी पत्रकारितेचे लोकशाहीकरण आणि पुनरुज्जीवन केले. मात्र यामुळे समाजात चिंताही वाढल्या आहेत, असे राष्ट्रपती म्हणाले.
माध्यमांचे हे नवे रूप वेगाने लोकप्रिय झाले, मात्र पारंपरिक माध्यमांमध्येच बातम्यांची सत्यता पडताळण्याचे कौशल्य आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. भेदभाव रहित पत्रकारितेच्या माध्यमातून पारंपरिक माध्यमांनी नागरिकांना माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले.