मुंबई – भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे’, असे अजब विधान केले आहे. भाजपच्या नेत्यांची शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव सुरूच असल्याचं यातून दिसून येत आहेत. सध्या प्रसाद लाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये त्यांनी हे व्यक्तव्य केल्याचं दिसून येत आहे. मात्र, प्रसाद लाड यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली असून, एका नवीन वादाला तोंड फुटल्याचा दिसून येत आहे.
दरम्यान, आता प्रसाद लाड यांच्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. आज रत्नागिरीत असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रसाद लाड यांच्या विधानाबाबात विचारले असता.
ते म्हणाले, “शिवाजी महाराजांकडून काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं, जे महाराजांनी शिकवलं, त्या गोष्टी शिकायचं नाही. फक्त नको ते वाद करत बसायचे. एवढच सध्या सुरू आहे.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सध्या बेरोजगारी, शिक्षण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष विचलीत करण्यासाठी नको ते विषय काढले जातात, असं देखील राज ठाकरे म्हणाले होते.