Rahul Gandhi – मुंबई येथे आज वंचितची संविधान सन्मान महासभा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सभेची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर संविधान सन्मान महासभेचे आयोजन केले आहे. वंचित बहुजन आघाडीने या महासभेस मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील लाखो लोक सहभागी होतील, असा दावा केला आहे.
अशात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीला पत्र लिहिले आहे. राहुल गांधी म्हणाले की, ‘संविधान सन्मान महासभेच्या निमंत्रणासाठी मी तुमचे आभार मानू इच्छितो. संविधान दिनाच्या स्मरणार्थ महासभा आयोजित केल्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अभिनंदन करू इच्छितो.’
राहुल गांधी यांनी पुढे लिहिले आहे की,’आज आपण एका गंभीर मार्गावर आहोत. गेल्या नऊ वर्षांत आपण आपल्या घटनात्मक मूल्यांवर सातत्याने हल्ला होत असलेला पाहिला आहे. सध्याच्या स्थितीत या सविंधनिक मुल्याचे रक्षण करणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी बनली आहे. पण दुर्दैवाने, माझ्या सध्या सुरू व्यस्त कामकाजामुळे मी आजच्या संविधान सभेला उपस्थित राहू शकणार नाही. मी वंचित बहुजन आघाडीला त्याच्या आणि तुमच्या भावी प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो.’ असे गांधी म्हणाले.