नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या मोदी सरकारविरोधातआक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. संधी मिळताच ते मोदी सरकारवर कडाडून टीका करत आहेत. अशातच आज राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
राहुल यांनी आज (मंगळवारी) देशातील वाढत्या कोरोना संक्रमणावरून मोदी सरकारवर टीकास्त्र डागले. याबाबत ट्विट करत त्यांनी, ‘मोदी सरकारच्या गलथान कारभारामुळे… १) भारतातील कोरोना रुग्णाची संख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. २) भारतामध्ये आठवड्यात वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या अमेरिका व ब्राझील या दोन देशांमध्ये आठवड्यामध्ये वाढलेल्या रुग्णांच्या एकत्रित संख्येपेक्षाही अधिक आहे. ३) रविवारी जगात आढळलेल्या एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येतील भारताचा वाट ४० टक्के इतका होता. ४) कोरोना संकटामध्ये काडीमात्र घट झालेली नाही.’ असा दावा केला.
Due to Modi Govt’s gross mismanagement of Covid:
1. India’s total cases world’s 2nd highest.
2. India’s weekend tally higher than US & Brazil put together.
3. On Sunday, India’s share was 40% of total cases worldwide.
4. No flattening of curve.
Stay safe everyone.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 8, 2020
भारतातील कोरोना संकट गेल्या काही दिवसांपासून अधिकच गडद होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे.
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी आजच (मंगळवारी) मोदी सरकारवर कंपन्यांच्या खाजगीकरणावरून निशाणा साधताना, पंतप्रधान देशामध्ये सरकारी कंपन्या विकण्याचे अभियान चालवत असल्याचा आरोप लगावला आहे.
मोदी जी ‘सरकारी कंपनी बेचो’ मुहीम चला रहे हैं।
खुद की बनायी आर्थिक बेहाली की भरपाई के लिए देश की सम्पत्ति को थोड़ा-थोड़ा करके बेचा जा रहा है।
जनता के भविष्य और भरोसे को ताक पे रखकर LIC को बेचना मोदी सरकार का एक और शर्मनाक प्रयास है। pic.twitter.com/W4OjDJ1nY7
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 8, 2020