Rahul Gandhi – भारतीय लष्कराच्या सेवेत कर्तव्य बजावत असताना ज्यांना प्राणांचे मोल द्यावे लागते, अशा ” अग्निवीरां’ (Agnivir) नाही शहिदाचा दर्जा दिला जात असून, त्यांच्यावर लष्करी इतमामात अंतिम सरकार करण्यात येतात.
तसेच शासनाच्या धोरणानुसार अशा शहिदांच्या वारसांना, कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली जाते. याबाबत कॉंग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi) करत असलेलेसर्व आरोप निराधार आणि बेजबाबदारपणाचे आहेत, असे भाजपाने म्हटले आहे.
सियाचिन हिमनदी परिसरात झालेल्या दुर्घटनेमध्ये शहिद झालेल्या अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते याच्या मृत्यूप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप भाजपने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
भाजप नेते अमित मालवीय यांनी “अग्निवीर’ गवतेच्या मृत्यूबाबत सांगितले की, अग्नीवीर गवते अक्षय लक्ष्मण गवतेने सेवेदरम्यान आपला जीव गमावला आहे आणि त्यामुळे कर्तव्य बजावताना प्राण गमावलेला सैनिक म्हणून नुकसान भरपाई मिळण्याचा तो हक्कदार आहे.
अमित मालवीय यांनी सोशल साइटवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, सरकारच्या समान योगदानासोबतच त्यावर व्याजाची रक्कमही दिली जाईल. अग्निवीरच्या मृत्यूला चार वर्षे पूर्ण होईपर्यंत कुटुंबाला हे लाभ मिळणार आहेत.
अमित मालवीय यांनी दावा केला की, गवते यांच्या मृत्यूच्या तारखेपासून चार वर्षे पूर्ण होईपर्यंत, अग्निवीरच्या कुटुंबाला त्यांच्या उर्वरित सेवा कालावधीसाठी पगार मिळेल, जो 13 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. सशस्त्र सेना युद्ध अपघात निधीतूनही आठ लाख रुपये नियमानुसार दिले जातील.
पुढे, अमित मालवीय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी, तुम्ही कृपया खोट्या बातम्या पसरवू नका. तुम्ही पंतप्रधान होण्याची आकांक्षा बाळगता आहात, तर विषय संपूर्णपणे समजून घेतल्याशिवाय बोलू नका. महाराष्ट्रातील अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांचा शनिवारी पहाटे सियाचीन येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला.
याबाबत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेबाबत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. अग्निवीर हा भारताच्या वीरांचा अपमान करण्याचा प्लॅन असल्याचे ते म्हणाले होते. ते म्हणाले की, अग्निवीरच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन किंवा इतर लाभ दिले जात नाहीत.