पुणे – कमिन्स इंडिया फाउंडेशन, मिशन सिटी चक्र, जनवाणी व पुणे महानगरपालिका यांच्या विद्यमाने पुणे शहरात निंबध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथील जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पेरिविंकलच्या इयत्ता आठवीची विद्यार्थिनी रतीश्री अग्रवाल हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, केपीआयटी टेक्नाॅलाॅजीजचे रवि पंडित, गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. अजित रानडे आदी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांना लेखन व वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या मनामध्ये प्लॅस्टिक न वापरण्याबाबत जागृती निर्माण व्हावी, यासाठी कमिन्स इंडिया फाउंडेशन, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या यशाबद्दल चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संचालक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी रतीश्री अग्रवाल हिचे कौतुक केले. हे यश संपादित करण्यासाठी रतिश्री हिला मुख्याध्यापिका स्वाती कोल्हे , शिक्षिका व पालकांनी मार्गदर्शन केले.