चाकण -महाराष्ट्र शासनाच्या माझी व सुंधरा अभियानामध्ये भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचतत्वाची वृद्धी होण्यासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी काम करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून अग्नी या घटकामध्ये ऊर्जा वापर हा महत्वाचा घटक असून सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर होणे व नागरिकानमध्ये जनजागृती होणे यासाठी नगरपरिषदेने शुक्रवारी (दि. 17) कार्यालयातील शिवछत्रपती सभागृहामध्ये मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्या प्रमुख उपस्थित सौर ऊर्जा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये मार्गदर्शक म्हणून सल्लागार, पर्यावरण व नैसर्गिक ऊर्जा पुनर्वापर समिती मुकुंद मावळंकर यांनी सौर ऊर्जा चे महत्व सांगितले, आजच्या काळात आपल्याला घरगुती वीज वापरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वीज बिल येतात. आपण सौर ऊर्जेचा वापर केला तर आपणाला येणारे बिल हे शून्य किंवा खूप कमी करता येऊ शकतात. यामध्ये सौर वाटर हीटर, सोलर पॅनल, हिट पंप बसविण्यासाठी सबसिडी लिंकेज उपलब्ध करून देणे, त्यासाठी येणाऱ्या अडचणी कश्या पद्धतीने सोडवाव्या, आपली वीज कशी बचत करावी, महावितरणचे काय नियम असतात,
शासनाकडून कशा प्रकारे व किती सबसिडी मिळते, आपण आपल्या खासगी इमारतीवर 1 किलोवॅटपासून पुढे आपल्या गरजेनुसार प्रकल्प राबवू शकतो, त्याची सर्व माहिती दिली. याअनुषंगाने नगर परिषद चाकणने आपल्या इमारतीवर सुद्धा 20 किलो वॅटचा सोलर पॅनल बसविला आहे. त्यामुळे नगर परिषदेला खूप कमी प्रमाणात वीज बिल येत आहे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.
या प्रकारे आपण पारंपारिक ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा असे आव्हान मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी केले आहे यावेळी चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, उपमुख्याधिकारी राजेंद्र पांढरपट्टे, नगरपरिषद विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कारपे प्रतिनिधी आणि चाकण शहरातील युवा उद्योजक, बिल्डर, व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.